Thursday, May 15, 2008

शिवरायांच्या पदस्पर्शाने 
पावन झाली महाराष्ट्राची माती...
याच मातीत जन्म लाभला, 
थोर माझे भाग्य किती?


माझी कविता- माझी सवत

माझी कविता आता माझी सवत झालीय,
कारण ती आता त्याला,
माझ्यापेक्षा आवडु लागलीय.

तो नेहमी म्हणतो,
"राणी, माझ्यावर तु कविता कर,
कवितेतुन बरस माझ्यावर,
कवितेतुनच प्रेम कर."

माझा प्रश्न,
"राजा, फक्त तु एकदाच ठरव,
तुला मी आवडते की कविता?
याचं तु कोड सोडवं."

यावर त्याचं उत्तर,
"अग, तुच माझी कविता,
अन् तुच माझं गाणं;
तुझ्या सोबत आता,
फक्त तुझ्या कवितेतच जगणं."

खरचं, कळत नाही याला,
कवितेचं कसलं वेड लागलयं????
माझीच कविता आतामाझी सवत झालीय.

त्यादिवशी ,
त्यादिवशी तर कहरच झाला,
मला प्रेमाने जवळ घेत म्हणाला,
"मीही एक कविता केलीय,
आपल्या प्रेमाची गाथा मी,
कवितेतुनच गायलीय."

खुशीने डोळे मिटुन,
त्याच्या छातीवर डोक ठेवलं,
तेवढ्यात त्याच्या खिशात
काहीतरी चौकोनी लागलं.

"तुझ्याच कवितांची वही,
राणी, मी माझ्या ह्रुदयाजवळ ठेवलीय,
तुझ्याच कवितेतले शब्द चोरुन,
आपली प्रेमकविता मी केलीय"

यावर उपाय म्हणुन
मी आता कविता करत नाही,
पण तोही आता माझ्याशी,
कवितेशिवाय बोलत नाही.

नको नको त्या कल्पनेतुन
कवितेतुन तो बरसु लागलाय,
त्याच्या कवितेचा अर्थ लावताना
स्वर माझा बिघडु लागलाय.

पण तरीही,
त्याच्या कविता ऐकण्याची
आता मला सवय झालीय.

शेवटची कविता

काल माझी कविता अचानक सांडली,
नको नको म्हणताना,बेभान धावली,
त्याला शब्दात शोधत, गावभर हिंडली,
डोंगर, दर्या, नद्या तुडवत,चहुदिशांत बागडली,
सैरावरा पळत, त्यालाच शोधत राहीली,

माझ्या भावना पण कोरड्याच,काय करतील बिचार्‍या ,
त्याच्यापासुन दुर होताना, आधीच मेल्या होत्या सार्‍या,
कवितेलाच समजावले मी,व्यर्थ तु भटकू नकोस,
शब्दच रुसलेत त्याच्यावर,शब्दात त्याला शोधु नकोस,

मग हळुच बिचारी, डोळ्यांत माझ्या हरवली,
अश्रु बनुन गालावरुन ओघळली,
म्हणुनच कदचित,कविता मला सुचत नाही
भावना कधीच मेल्या माझ्या, शब्दांतही जीव नाही.